गुहागर -राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहुन अनेक जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आले होते.या लॉकडाऊनमुळे काहींचे व्यवसाय बंद आहेत तर अनेकांना नोकरी वर जाता येत नाही.त्यामुळे मळण येथील श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत अशा या कठीण काळात गरजू लोकांना धान्य वाटप केले.
श्री स्वामी समर्थ मठ (रजी.) साई हिलचे अध्यक्ष नरेश बारे आणि पंचमुखी सेवा संस्थान भांडुप मुंबईचे अध्यक्ष जगन्नाथ कदम आणि मळण गावचे सुपुत्र विनय जाधव यांच्या संकल्पनेतून मळण गावातील गरजू लोकांना मदत म्हणून तूरडाळ ( 400 किलो)आणि तांदूळ (2 टन ) धान्य वाटप करण्यात आले. श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळाने सत्यनारायण सभागृह मळण कुंभारवाडी या ठिकाणी गावातील साधारण 400 कुटुंबाना 5 किलो तांदूळ आणि 1किलो तूरडाळ या प्रमाणात धान्याचे मोफत वाटप केले.
वाटप करताना मंडळाचे सल्लागार मोहन तांबे, अशोक जाधव, दिलीप साळवी, अशोक साळवी ,कृष्णा साळवी मंडळाचे माजी सचिव सोमा साळवी, जेष्ठ कार्यकर्ते वसंत रामचंद्र साळवी , शांताराम भागोजी शिगवण ,विद्यमान अध्यक्ष मनोहर साळवी ,सचिव प्रमोद साळवी ,किशोर साळवी ,माजी अध्यक्ष विलास साळवी ,राजाराम जाधव ,चंद्रकांत साळवी ,प्रफुल्ल साळवी मंगेश साळवी, दिनेश साळवी, रविंद्र साळवी आणि मंडळातील सर्व युवा कमिटी सदस्य उपस्थित होते.