गुहागर -रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा प्रतिदीनी शासकीय घोषवारा जाहीर केला जातो.त्याची पडताळणी केली असता जिल्ह्यतील काही कॉरोन्टाईन सेंटरमधील रुग्ण संख्या दिसुन येत नाही.ही रुग्ण संख्या जाणूनबुजून तर लपवीली जात नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे.असे असेल तर भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्युंची संख्याही लपवली जाण्याची भिती भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ.विनय नातू यानी व्यक्त केली आहे.
कोरोना परीस्थीतीचा आढावा प्रतिदीनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने कोवीड-१९ कक्षाकडुन जाहीर करण्यात येतो.त्याप्रमाणे १८ जुलै २०२० रोजी सायंकाळी ६ वा. ही माहीती प्रसिद्ध करण्यात आली मात्र त्यामधे गुहागर तालुक्यातील कॉरोन्टाईन सेंटरबाबत कोणतीच माहीती नाही.कोरोना परीस्थीतीचा सामना करण्यासाठी व आटोक्यात आणण्याकरीता अधिकृत असे वेळणेश्वर येथील पर्यटन विकास महामंडळाचे संकुल व भाड्याचे इंजिनीअरींग कॉलजचे वस्तीगृह घेण्यात आले. मध्यंतरी गुहागर तालुका कोरोना शुन्य पेशंट झाला होता. मात्र आता गुहागर तालुक्यात ही संख्या ५० पर्यंत पोहचलेली असताना त्याची नोंद शासकीय आकडेवारीत असणे अत्यावश्यक आहे.गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधीतांपैकी १७ रुग्ण हे वेळणेश्वर येथील कॉलेज वस्तीगृहात,तर काही ग्रामीण रुग्णालयात,काही घरगुती विलगीकरणात आहेत. याची नोंद शासकीय आकडेवारी प्रसिद्धी पत्रकात नसल्याने मुंबई प्रमाणे कोरोनाबाधीतांची संख्या लपविली जात असल्याची शंका निर्माण झाली असुन भविष्यात रत्नागिरी जिल्हा शासकीय यंत्रणेकडुन कोरोनामुळे झालेल्या कींवा होणा-या मृत्युंची स़ंख्या लपविली जाण्याची भिती डॉ.नातू यानी व्यक्त केली असून यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे आरोग्य बिघडणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. वेळणेश्वर येथील पर्यटन विकास महामंडळाचे शासन संबधित संकुल असताना त्याचे उशिराने अधिग्रहण.अधिग्रहण होउनही आजपर्यंत रुग्ण दाखल नाही.मात्र भाड्याने घेतलेल्या व भाडे थकीत असणा-या इंजिनीअरींग कॉलेज वस्तीगृहात १७ रुग्ण आहेत.