बातम्या शेअर करा

चिपळूण – ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लढविणारे सदस्य आणि सरपंच पदासाठीचे उमेदवार यांच्यासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाकडून घालून देण्यात आली आहे.

ही मर्यादा उमेदवारांनी पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. २ डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. या उमेदवारांना आयोगाच्या मर्यादेपर्यंतच निवडणूक खर्च करावा लागणार आहे.जिल्ह्यात २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या सदस्याला किंवा सरंपचाला गुहागर संगमेश्वर निवडणुका निवडणूक आयोगाने ठरावीक खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. रत्नागिरी निवडणुकीचा अर्ज भरल्यापासून प्रत्येक दिवसाचा खर्च या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे दाखल करावा लागतो. लांजा कालावधीत मुदत संपणाऱ्या राजापूर निकालानंतर ३० दिवसांच्या आत सर्व खर्च सादर करावा लागतो. अन्यथा तो उमेदवार निवडून आल्यास त्याच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाते.

जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८ रोजी मतदान होणार आहे. सदस्य किंवा सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाया उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या अधीन राखूनच खर्च करावा लागणार आहे. हा खर्च त्यांना दर दिवशीच सादर करावा लागणार आहे.- शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन, रत्नागिरी


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here