गुहागर – पावसाळ्यामध्ये जीव मुठीत धरून वास्तव्य करणाऱ्या गुहागर तालुक्यातील कारुळ येथील त्या३८ कुटुंबासाठी राज्य शासनाने आपला दूत पाठवला आहे. भूस्खलनग्रस्त कारुळ गावाला राज्याचे उपसभा सचिव धनंजय महेश नायक यांनी भेट दिली असून वस्तुस्थितीची पाहणी केली.
यामुळे दहशतीखाली असलेल्या या कुटुंबांना योग्य न्याय मिळण्याच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत.गुहागर तालुक्यातील कारुळ हुंबरेवाडी, जोशी वाडी व जांभळेवाडी वाड्यांमध्ये भूस्खलन होत असल्याने येथे घरांना तडा गेला आहे.जमिनीमध्ये पडलेल्या भेगा येथील दहशत स्पष्ट करते. ६ ऑगस्ट २०१९ मध्ये भूसंकलनाची सुरुवात झाली अति मुसळधार पावसामध्ये येथील जमिनीमध्ये भूकंपासारखे हादरे बसून घराखालील जमीन व घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या दिसून आल्या. गेली तीन वर्षे येथील ३८ कुटुंबांना गुहागर महसूल विभागाच्या वतीने स्थलांतरणाच्या नोटीसा बजावण्यात येतात. मात्र त्यांना प्रत्यक्षात कुठे स्थलांतरित करावे त्यांच्यासोबत असलेल्या जनावरांची व्यवस्था कशी करावी यावर मात्र प्रशासन मौन धारण करत आहे. गेल्या तीन वर्षात येथील कुटुंबांच्या स्थलांतरणाविषयी व त्यांच्यासाठी आवश्यक जागेच्या पाहणी विषयी गुहागर तहसील व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव मंत्रालयात दाखल झाला आहे. दाखल झालेल्या प्रस्तावावर अंतिम कार्यवाही शिल्लक होती अशाही परिस्थितीत येथील ग्रामस्थ गेली तीन वर्ष जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. दरम्यान कारुळ मधील या घटनेची राज्य शासनाने दखल घेतली आहे. राज्याचे उपसचिव धनंजय महेश नायक यांनी भेट दिली. येथील ग्रामस्थांच्या घरांचे व इतर जागांची पाहणी करत ग्रामस्थांजवळ संवाद साधला घरासाठी आवश्यक असलेल्या प्रस्तावित जमिनीचीही यावेळी पाहणी करण्यात आली या प्रस्तावित जमिनीला पसंती दर्शवण्यात आली व तहसिलदार व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्तावात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करून हा प्रस्ताव परिपूर्ण करावा असा आदेश त्यावेळी देण्यात आला. या पाहणी दरम्यान सर्कल अधिकारी शशिकांत साळुंखे, सचिव सचिन गवळी, ग्रामसेवक जाधव, पोलीस पाटील वसंत हुंबरे, उपसरपंच एकनाथ मोहिते, जिल्हा परिषद शाखा अभियंता रमेश ढगे उपस्थित होते. यावेळी अपादग्रस्त दीपक गुरव यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी याबाबत कोणतेही श्रेय न घेता येतील ग्रामस्थांना लवकरात लवकर शासनाकडून पुनर्वसन मिळावे यासाठी भूमिका मांडली.