चिपळूण – रत्नागिरी शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस मिळवणाऱ्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ शिक्षक सापडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अशा बोगस प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांच्या नोकरीवर कायमची बंदी घालण्यात येणार असल्याने धावपळ उडाली आहे.राज्यभर टीईटी घोटाळा चांगलाच गाजत असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. आता नाशिकमधील समावेश असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.गेल्या काही महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील टीईटी टप्प्या-टप्प्याने मोठा घोटाळा उघडकीस आला. त्याचे धागेदोरे राज्यातील मोठ मोठ्या शहरांत आढळले असून, ते रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. जवळपास परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी ७ हजार ८८० उमेदवार बोगस प्रमाणपत्रधारक म्हणन आढळन समावेश आहे.दरम्यान, या टीईटी घोटाळ्यात बोगस प्रमाणपत्र असणाऱ्या शिक्षकांची यादी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०१९ मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह उच्च पदस्थ अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते. त्यानंतर चौकशीनंतर राज्यभरात सुमारे ७ हजार ८८० शिक्षकांना बोगस टीईटी प्रमाणपत्र देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या बोगस प्रमाणपत्र धारकांमध्ये रत्नागिरीमधील ३७ शिक्षकांचा समावेश आहे.