गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात तब्बल २१०० बसेस येणार

0
167
बातम्या शेअर करा

रत्नागिरी- गेल्या दोन तीन वर्षात कोरोनामुळे एसटी पूर्णतः तोट्यात आहे. मात्र, यंदा तिला बाप्पा पावणार आहे. कोरोना पश्चात राज्यात पहिल्यांदाच मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. येत्या दोन दिवसात रत्नागिरी एस.टी. विभागाचे गणेशोत्सव नियोजन पार पडणार आहे. जिल्ह्यात तब्बल 2100 बसेस चाकरमान्यांना घेऊन 25 ऑगस्टपासून दाखल होणार आहे.

कोरोना महामारीआधी गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या परतीसाठी 1500 ते 1600 गाड्यांचे नियोजन केले जात होते. यंदा लाखोंच्या संख्येने चाकरमानी या आठवड्यात कोकणात दाखल होणार असून या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी एसटी विभाग सज्ज झाले असल्याची माहिती रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी यांनी दिली.

कोकणातील गणेशोत्सवाची परदेशातही कुतुहल आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर विशेषतः घरोघरी हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. यासाठी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने या उत्सवासाठी कोकणात दाखल होणार आहे. ज्याप्रमाणे एसटी विभागाने चाकरमान्यांच्या स्वागतासाठी तयारी सुरु केली आहे.त्याचप्रमाणे कोकण रेल्वेही सज्ज झाले आहे. कोकण रेल्वेच्या 272 जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत तर एसटीच्या जवळपास 1 हजाराहून अधिक गाड्यांचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. येत्या दोन दिवसात हे नियोजन पूर्ण करण्यात येणार असून एकूण गाड्यांचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here