बातम्या शेअर करा

खेड – आता तरी जिल्हा प्रशासनाने खाजगी हॉस्पिटल ताब्यात घ्यावीत अजून किती जणांचे प्राण घेतले जाणार आहेत असा उद्विग्न सवाल खेडचे नगराध्यक्ष तथा मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केलं आहे.

शासकीय रुग्णालयात रुग्ण दाखल करणे आता खूप भीतीदायक झाले आहे. कारण या रुग्णालयात काय उपचार करतात ते बाहेर कोणालाच काही ही माहिती नसते त्यामुळे नातेवाईक ही कायम काळजीत असतात.
दरम्यान आज घडलेली खूप दुःखद आहे. कारण अस समजत की त्या रुग्णाला कोविडची बाधा होतीच पण हार्ट अटॅक आल्याची ही चर्चा होती. हे जर खर असेल तर मग कोविड केंद्रात आज किती डॉक्टर हृदय तज्ञ असतात का एखादा रुग्ण कोविड 19 शिवाय अन्य आजाराने गँभीर झाला तर त्याला इतर वैदयकीय सुविधा काहीच नसतात कारण आज शासकीय रुग्णालयात खाजगी किती डॉक्टर काम करत आहेत काही खाजगी डॉक्टर भीती पोटी ही या कोविड रुग्णालयात काम करायला तयार नाहीत.
या साठीच जिल्हा प्रशासनाने काही चांगली खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेऊन लोकांना त्याचे जीव वाचवायला मदत होईल कारण काही लोक भीती पोटी शासकीय रुग्णालयात जाऊ शकत नाही आणि जर आज आपलं कोविड सेंटर एवढे चांगले आणि सुसज्ज असते तर जिल्ह्यातील शासनाचे अधिकारी रत्नागिरी च्या बाहेर जाऊन खाजगीत नाही ना जाऊन उपचार केले असते.
दुसरं कारण अस की मंडणगड पासून चिपळूणचे लोक शासकीय रुग्णालयात येऊ शकत नाहीत आता पावसाळ्यात त्यांना ही चिपळूण मध्ये एखाद खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेऊन तेथे कोविड रुग्णावर उपचार करावेत.
अमिताभ बच्चन सारख्या श्रीमंत व्यक्तीला नानावटी मध्ये उपचार केलेले चालतात मग सर्वसामान्य लोकांना का नाही.
जिल्ह्यातील खाजगी हॉस्पिटल मिळत या बाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती पाऊले उचली नाही तर पुढे होणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा इशारा ही नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here