बातम्या शेअर करा

चिपळूण – चिपळूण तालुक्यातील खड्पोली येथील एमआयडीसी मधील गोडाऊन मध्ये निकृष्ठ दर्जाचे खाद्यपदार्थ सापडले त्यामुळे संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असताना चिपळूण पंचायत समितीच्या वरीष्ठअधिकारी यांनी साधी त्याची दखल सुद्धा घेतली नाही. त्यामुळे अशा अधिकारी यांची चोकशी होऊन त्यांच्यावर फोजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी संतप्त मागणी खड्पोली येथील सामाजिक कार्यकर्ते मुराद अडरेकर यांनी केली.

चिपळूण तालुक्यातील खडपोली एमआयडीसी येथे महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटीव् फेडरेशनच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेत वयोगट ०-६ वयातील बालकांना पोषण आहार पुरवठा करण्यासाठी सशक्त असे गोडाऊन घेतले आहे. सदर गोडावून मध्ये ते धान्य साठवून ते स्वच्छ करून पॅक करून सगळ्या जिल्ह्यात पुरवठा करत असतात मात्र नुकत्याच या ठिकाणी स्थनिक ग्रामस्थांनी भेट दिली असता निकृष्ठ दर्जाचे “शेकडो टन भिजलेला बुरशीयुक्त मसुरडाळ, चना भिजलेला आणि अळ्या असलेला आणि त्याचा खडा झालेला तांदूळ” सुकविण्यासाठी विद्युत यंत्रणा वापरण्यात येत असल्याचे आढळले त्यानंतर “सुकलेल् तेच धान्य यांत्रिकी जाळीवर स्वच्छ करून पॅकिंग” करून बालकांच्या पालकांना पोषण आहार म्हणून जवाबदार जिल्हापरिषद महिला एकात्मिक बाल विकास विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्यात पोहच केले जाते असे समजले. त्यानंतर गेले दोन दिवस तालुक्याच्या “”गटविकास अधिकारी सारिका पवार सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद जाधव आय एसटीच्या विभागीय प्रकल्प अधिकारी सौ शिंदे यांच्याकडे मुराद अडरेकर यांनी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शिवाय सदर ठिकाणी येऊन पाहणी देखील करण्याचं धाडस केले नाही उलट सदर विषय आमच्या संबंधित नाही असे सांगून जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडे बोटे दाखविली”” म्हणून या बाबत मुख्य कार्यकारी बघाटे यांच्याशी मुराद अडरेकर बोलले तेव्हा ते कोरोना पोजेटीव्ह असल्याने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे बोला म्हणून प्रभारी “उप मुख्यकार्यकारी अधिकारी मारबन यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले त्यानुसार अडरेकर यांनी संपर्क साधून सदरचा विषयावर त्यांना सांगितलं असता त्यांनी माहिती घेतो आणि संबंधितांना कळवितो असे सांगितले एकूणच सदर पुरवठा धारकावर ही सर्व प्रशासकीय यंत्रणा कारवाई करण्याची कृती दाखविली नाही म्हणून मुराद अडरेकर यांनी पत्रकारांना घेऊन हा प्रकार उघड केला.

वेळोवेळी संपर्क करून देखील पंचायत समितीचे बीडीओ सरिता पवार, एडीओ अरविंद जाधव ,आयएसटीच्या सौ शिंदे यांनी येऊन पाहणी करण्याची साधी तसदी देखील घेतली नाही शिवाय सदरचा विषयच आपला नाही सांगून हात वरती केले.त्यामुळे अशा या बेजबाबदार व्यक्तीवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी मात्र जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने” यांनी तात्काळ दखल घेत हे गोडावून सील केले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here