कशेडी घाटातील दरड हटविण्यात यश; तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू

0
1
बातम्या शेअर करा

खेड – कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील खवटी परिसरात नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल १२ तास पूर्णपणे ठप्प झाली होती. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर दरड हटविण्याचे काम हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर प्रशासनाला दरडीचा मोठा भाग बाजूला करण्यात यश आले असून तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून उर्वरित माती व दगड हटविण्याचे काम अद्यापही सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सावकाश सुरू असून वाहनचालकांना संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, रस्ता पूर्णपणे मोकळा होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोकणात मुसळधार पाऊस कायम असल्याने घाट परिसरात दरड कोसळण्याचा धोका अद्यापही कायम असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here