गुहागर – गुहागर तालक्यातील पालशेत येथे नुकतेच श्री आगडी देवी कृपा बर्फ कारखान्याचे उदघाटन झाले. या बर्फ कारखाना उद्घाटन समारंभ गावातील जेष्ठ नागरिक तुकाराम नार्वेकर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी गावातील सर्व मान्यवर मंडळीही उपस्थित होती. बर्फ कारखाना मालक प्रज्ञेश नार्वेकर यांच्याशी सवांद साधला असता ते म्हणाले की, पालशेत कारुळ बोऱ्या वेळणेश्वर येथील मच्छीमार बांधवांना बर्फ विकत घेण्यासाठी तळी किंवा चिपळूण येथे जावे लागते. ही अडचण लक्षात आल्यावर पालशेतमध्ये छोटासा बर्फ उत्पादनाचा कारखाना असावा, यासाठी प्रयत्न केले आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) या योजनेंतर्गत २ टनचा बर्फ कारखाना सुरू केला. या प्रकल्पासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाटद खंडाळा-रत्नागिरीमधून आर्थिक सहाय्य मिळाले, त्यासाठी तेथील शाखा व्यवस्थापक निलेश शिखरे (मुंबई) आणि सहाय्यक प्रबंधक योगेश नार्वेकर तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गावडे या सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले. या बर्फ कारखान्याचा फायदा पालशेत तसेच आजूबाजूच्या गावातील मच्छीमार बांधवांना होणार आहे. बर्फ जवळच गावामध्ये भेटल्यामुळे वेळ आणि वाहतूक खर्च वाचणार आहे. अधिक माहितीसाठी ९१६७४१३६१९, ८३९०७२४०२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.