गुहागर – गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शेकडोंच्या संख्येने गुहागर, शृंगारतली, आबलोली, हेदवी, तळवली अंजनवेल आदी व इतर भागात शिक्षण घेत आहेत,दहा ते पंधरा किमी अंतरावरून हे विद्यार्थी हायस्कूल मध्ये येत असतात.
या भागात येणाऱ्या सर्व एसटीच्या फेऱ्या सध्या बंद करण्यात आल्या असून यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे तरी गुहागर आगाराने एसटीच्या सर्व फेऱ्या सुरळीत पणे सुरू कराव्या अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने गुहागर आगाराचे व्यवस्थापक वैभव कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ग्रामीण भाग असलेल्या कर्दे मुसलोडी,रोहीले,पडवे, व इतर गावातून विद्यार्थ्यांना यावे लागते, सर्वच विद्यार्थ्यांचा प्रवास एसटीने होतो परंतु गुहागर आगाराकडून या परिसरात जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा कि.मी. अंतरावरून मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वारा डोंगर, घनदाट झाडी, झुडपे तुडवीत पायपीट करावी लागत
आहे, अनेक आपत्तीचा सामना करून विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागत आहे,तर काही विद्यार्थ्यांना पर्यायी खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे , नाहकआर्थिक त्रास पालकांना व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. पायपिट करून शाळेत जावे लागत असल्याने शाळेत उशिराने विद्यार्थी जात आहेत, अनेक शाळांमध्ये दुर्गम भागातून मुले शिक्षणासाठी येत असतात, सकाळ व संध्याकाळच्या वेळेत या मुलांना शाळेच्या वेळेवर पूर्वी एसटी बस उपलब्ध होत्या मात्र जून पासून शाळा सुरू होऊनही एसटी सेवा अद्यापही सुरषळीत झालेली नाही, गुहागर तालुक्यातील अनेक भाग दुर्गम असून घनदाट झाडी व डोंगराचा आहे, हे सर्व विद्यार्थी गरीब कुटुंबातील आहेत, मुसळधार पावसामुळे बहुतांश मुले अर्धे भिजत आलेली असतात त्यांना वर्गात बसणे ही कठीण होते, खाजगी वाहनातून प्रवास करणे या विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नसल्याने हे विद्यार्थी पायपीट करून शाळेत जात असतात व शाळेतून परत घरी परतत असतात.अनेक विद्यार्थ्यांकडे खाजगी वाहनांसाठी पैसे नसल्याने हे विद्यार्थी शाळेत जात नाहीत,तरी ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांसाठी योग्य सेवा उपलब्ध करावी, शाळेच्या वेळेनुसार गाड्या येण्यासाठी तजबीज करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर यांच्या वतीने करण्यात आली आहे निवेदन देताना गुहागर मनसे तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर, अंजनवेल विभाग अध्यक्ष तेजस पोफळे, प्रसाद कुष्टे,सागर शिरगावकर,विवेक शिर्के उपस्थित होते