गुहागर – गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडीतील ग्रामस्थांना एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतच अंत्य विधीसाठी नेताना नदीतील कंबरभर पाण्यातून प्रवास करून अंत्य यात्रा न्यावी लागत आहे, तरी शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी तेलीवाडीतील नागरिकांनी केली आहे.
एकीकडे देश स्वांतत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष साजरा करत असतानाच आजही ग्रामीण भागात अनेक महत्वाच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत.या सोयी सुविधेकडे शासन व लोक प्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकाना आता मरणानंतरही हाल भोगावे लागत आहेत, मृत्यू नंतर तरी शासन आम्हाला सुखाने मरण देईल का असा सवाल नागरिकांनी व्यक्त केला आहे, गुहागर तालुक्यातील वरवेली तेलीवाडी येथील नागरिकांना पावसाळ्याच्या दिवसात कंबरेभर पाण्यातून नदी ओलांडून स्मशान भूमी कडे अंत्यविधीसाठी प्रेतयात्रा न्यावी लागत आहे, विशेष म्हणजे स्मशान भूमी कडे जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसून प्रेतयात्रा नेताना नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे,ग्रामीण भागात स्मशानभूमीचा विकास करणे हे दूरच राहिले आहे. अंत्यसंस्कारासाठी जाण्यासाठी रस्ते अशा प्राथमिक सुविधा पुरवण्याची फुरसत शासनाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.विजेची समस्या, अडचणीच्या पायवाटा तसेच भर पावसात नदी- ओढ्यातून कमरे इतक्या पाण्यातून चाललेली प्रेतयात्रा तसेच दगड धोंड्यातून चाललेला प्रवास ही अवस्था वरवेली तेलीवाडीच्या स्मशान भूमीकडे जाताना पाहावयास मिळते. वरवेली तेलीवाडीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना दगड गोटे तुडवीत, नादुरुस्त रस्त्यावरून,जंगल भागातून प्रेत यात्रा न्यावी लागते. मृत्यूनंतरही मरण यातना नागरिकांना भोगावी लागत आहेत. अशा एकंदरीत परिस्थितीमुळे लोकांना जिवंतपणीच मरणाची भीती वाटू लागली आहे, मृत्यू नंतर असे हाल भोगावे लागणार असे आताच चित्र दिसत आहे. तरी वरवेली तेलीवाडीच्या स्मशान भूमी लगत असणाऱ्या नदीवर पूल बांधून मिळावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चौकटस्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटा तसेच रस्ते त्याची शासन दप्तरी नोंद नसल्याने रस्त्याच्यामध्ये येणारे नदी- ओढे याच्यावरती पूल बांधण्यात शासकीय नियमांचे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पावसाळ्यात प्रेत नेताना नदी ओढ्यातून जावे लागते.