भाग -02
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात एखाद्या ठेकेदाराला काम करायचे असेल तर तुमच्यावर येथील अधिकाऱ्यांची मर्जी तर हवीच आणि तुम्ही सांगितलेले नियम आणि अटी जर त्या अधिकाऱ्याला मान्य झाल्या तरच तो ठेका तुम्हाला मिळेल कारण याच पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्याच्या मेहरबानीवर लायसनची मुदत संपलेल्या ठेकेदाराला चक्क करोडो रुपयांचे काम दिल्याचं या आधी उघड झाले आहे.त्यामुळे पाणीपुरवठा विभागात जर तुम्हाला काम करायचं असेल तर तुमच्याकडे फक्त लायसन्स नको तर तुम्ही तुमच्या नियम आणि अटी ज्या काही असतील त्या त्यांना सांगा त्याचं पालन करून तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला त्या कामात बदल करून ते टेंडर देण्याचा प्रकार सध्या रत्नागिरी जिल्हा परिषद मधील पाणी पुरवठा विभागात घडत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभाग गेली वर्षभर अनेक या न त्या प्रकरणाने नेहमी गाजत असते यात पाणी पुरवठा विभागात सध्या वरदा प्रोजेक्ट्स ला येथील अधिकारी खूपच मेहेरबान असल्याचे दिसत आहे. कारण याच ठेकेदाराच्या मर्जीने जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गुहागर तालुक्यातील मौजे माटलवाडी येथील सुधारणात्मक नळपाणीपुरवठा योजना या कामाचे टेंडर काढण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कामाच्या निविदापूर्व बैठकीमध्ये अधिकारी कर्मचारी आणि ठेकेदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीत जिल्ह्यातील इतर कोणत्याही ठेकेदाराला न बोलवता फक्त वरदा प्रोजेक्ट यांना बोलविण्यात आले आणि त्यांनी जशा सूचना दिल्या नियम आणि अटी सांगितल्या तशा नियमाने त्यामध्ये बदल सुचवले तसं त्यांच्या मर्जीनुसार ते ठरवून ती निविदा प्रसिद्ध करण्यात आली. जेणेकरून वरदा प्रोजेक्ट हे काम करेल अशाप्रकारे नियम आणि अटी ठेवण्यात आल्या. याबाबत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जी बैठक पार पडली या बैठकीला उपस्थित असणारे शाखा अभियंता यांनी आपण त्या बैठकीला उपस्थित नव्हतो असे सांगितले. त्यामुळे निविदा काढताना ज्या ठेकेदारावर एवढी मेहरबानी केली जाते ती नक्की का ? केली जाते असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर अधिकारी ,कर्मचारीवर्ग आणि ठेकेदार यांची कामाच्या निविदा बाबत पूर्व बैठक लावायची असेल तर पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांना का बोलावलं जात नाही ? असा प्रश्न आता अनेक ठेकेदार यांच्या कडून उपस्थित केला जात आहे. या आधी सुद्धा याच वरदा प्रोजेक्टवर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मेहरबान आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून पाणी पुरवठाविभाग आणि वरदा प्रोजेक्ट यांच्यामध्ये चाललेला हा खेळ त्वरित थांबवावा. अशी मागणी सर्व ठेकेदार करत आहेत.
या आधी वरदा प्रोजेक्टचे नोंदणी प्रमाणपत्र (लायसन्स ) जे आहे. त्याची मुदत संपलेली असताना सुद्धा कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांनी त्यांच्या लायसन्स वर कारोडो रुपयाचे काम मंजूर केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत गुहागर येथील चव्हाण कंट्रक्शन यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रार देखील केली आहे.
वरदा प्रोजेक्ट ठेकेदार यांचे नोंदणी प्रमाणपतत्राची ( लायसन्स )
मुदत 23 जुन 2021 रोजी संपली असताना सुद्धा त्यानंतरच्या अनेक निविदा प्रक्रियेत त्यांना भाग देऊन त्यांना काम देण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आथिर्क गोलमाल करत अधिकारी त्यांना सामील करुन घेत असल्याचा आरोप होत आहे. त्यामूळे येथील अधिकारी , लेखापाल यांच्या कामाच्या चौकशी सह संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा करण्यात येत आहे.