चिपळूण – रत्नागिरी जिल्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यानी प्रांताधिकार्यांना सूचना व अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर चिपळूणचे प्रांताधिकारी जयराज सूर्यवंशी यांनी आज चिपळूण शहरातील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला विविध व्यवसायातील प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत प्रांताधिकार्यांनी आलटून-पालटून व्यवसाय सुरू करावेत, अशी सूचना केली मात्र व्यापाऱ्यांनी ती मान्य केली नाही. नवयुग व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी सांगितले
आज रात्री नऊ वाजता खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम व काही व्यापारी यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. यात तोडगा निघण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उद्या शुक्रवारचा एक दिवस बाजारपेठ बंद ठेवा, अशी विनंती केल्यानंतर व्यापाऱ्यांनी ही विनंती मान्य केली. मात्र उद्या बाजारपेठ बंद असली तरी परवा शनिवारी दि. ११ जुलैपासून कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण चिपळूण बाजारपेठ आम्ही सुरू करणारच, अशी ठाम भूमिका शिरीष काटकर यांनी मांडली आहे.