चिपळूण शहरात पुराचे पाणी की गटाराचे पाणी ……

0
227
बातम्या शेअर करा

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि गुहागर तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय चिपळूण शहरातील शिवनदी दुथडी भरून वाहते मात्र असं असलं तरी चिपळूण शहरातील अनेक रस्त्यांवर मात्र सध्या गुडघाभर पाणी साचले. मात्र हे पाणी पुराचे नसून तर गटार नसल्याने रस्त्यावर आलेलं पाणी आहे.

पावसाळ्यात नेहमीच चिपळूणचा बोलबाला राहिला आहे.कारण चिपळूणमध्ये गेल्या वर्षी तब्बल अकरा वेळा पेक्षा जास्त वेळा पाणी भरलं त्या वेळेला हे पाणी संपूर्ण शहरात जवळपास पाच ते सहा फूट होत. मात्र या वेळेला दमदार पावसाने कालपासून सुरुवात करताच आज चिपळूण शहरातील चिपळून -कराड हायवे मुंबई-गोवा हायवे या रस्त्यावर सगळीकडे पाणी भरलेलं दिसत होतं. तर शहरातील सखल भागातील रस्ते खेर्डी येथील परिसर येथे पाणी भरताना प्रथम दर्शनी चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल. याबाबत आम्ही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहिल् तेव्हा मात्र हे पुराचे पाणी नव्हतं तर गटार तुंबल्याने किंवा गटार नसल्यामुळे हे पाणी रस्त्यावरून वाहत होते.त्यामुळे चिपळुणात पूर आला अशी स्थिती सोशल मीडियावर निर्माण झाले होती.

चिपळूण शहरातील गटारे बुजवणारे, गटारांचे मार्ग बदलणारे ,गटारे साफ न करणारे नगरपालिका असेल किंवा या गटारावर अनधिकृत बांधकाम केलेले असे जे व्यापारी आहेत. अशामुळे आज हीच अवस्था झाल्याचे या ठिकाणी दिसत होती.थोड्याशा पावसाने चिपळूण शहरातील रस्त्यांवर जर एवढं पाणी तुंबत असेल तर ज्या वेळेला वाशिष्ठी नदीला व शिवनदीला पूर येईल त्या वेळेला चिपळूण शहरात पाणी किती असेल आणि चिपळूणचे स्थिती काय असेल याचा विचार न केलेलाच बरा तेव्हा नगरपरिषदेने तात्काळ याची दखल घेऊन ज्या ठिकाणी गटार बंद झाले आहेत ती गटार साफ करावी ज्या ठिकाणी गटारे बुजलेली आहेत. ती गटार नव्याने तयार करावी आणि चिपळूण वासियांना या पुराच्या भीतीपासून दूर करावे अशी मागणी आता जोर आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here