बातम्या शेअर करा

वाई – (प्रवीण गाडे) – कोरोनाचा विळखा जिल्यात वाढत असुन आज दिवसभरात कोरोनाचे शंभर रुग्ण सापडल्याने सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून 22 जणांना डिस्चार्ज दिला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिगकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आज सकाळी 43 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले होते, तर 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रात्री पुन्हा 57 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू कोरोनाने झाल्याने आज एकाच दिवसात कोरोनाबाधित तिघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
त्यामुळे आता सातारा जिल्यात कोरोना बळींची संख्या 51 झाली आहे. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1245 वर पोहोचली आहे. त्यामुळे एकूण 415 कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here