मुंबई -राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे राज्य सरकारने कोरोना लसीकरणाला वेग दिला आहे.राज्यात 1 एप्रिलला तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांना लस (vaccination) देण्यात आली आहे.आरोग्यमंत्री ( health minister) राजेश टोपे यांनी ट्विट करत या लसीकरणाबाबत माहिती दिली आहे आणि त्यामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. यासाठी दररोज तीन लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.लसीकरणाला वेग देऊन यापेक्षा दुप्पट उद्दिष्ट गाठण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.