पहिली ते आठवी परीक्षा रद्द ; विद्यार्थ्यांना थेट पुढील वर्गात प्रवेश — शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

0
212
बातम्या शेअर करा


मुंबई:-राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे.त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे.ट्विटरवर व्हि.डि.ओ. शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड म्हणाल्या की,  आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या प्रकारे राज्यात कोरोनाची रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.अशा परिस्थितीत मी आपल्याशी संवाद साधत असताना,इयत्ता पहिली ते आठवी याचे वार्षिक मुल्यमापन संदर्भात मी बोलणार आहे.मला सांगायला पाहिजे की मधल्या काळात आपण ऑनलाईन, ऑफलाईन यूट्यूब, गुगल आदींच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवलं.खरंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा या वर्षात आपण शाळा सुरू करू शकलो नाही.पाचवी ते आठवीच्या शाळा आपण सुरू केल्या,परंतु काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या,काही ठिकाणी सुरू होऊ शकल्या नाहीत.ज्या ठिकाणी शाळा सुरू झाल्या त्या ठिकाणी देखील त्यांचा अभ्यासक्रम त्या पूर्ण करू शकल्या नाहीत.परंतु आपण सातत्यपूर्ण हा प्रयत्न करत होतो,की मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये.तसेच, आता कोरोनाची परिस्थिती पाहता आणि वार्षिक मुल्यमापनाबाबत निर्णय घेत असताना, आम्ही शालेय शिक्षण माध्यमाद्वारे असा निर्णय घेत आहोत की, पहिली ते आठवीचे जे विद्यार्थी आहेत,


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here