गुहागर- विजापूर रस्ता रुंदीकरण यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे शृंगारतळी या शुंगारतळी मध्ये सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम हे मोठ्या प्रमाणात आणि जोमाने सुरू आहे मात्र असं असलं तरी खरंच हे रस्ता रुंदीकरण आहे की रुंद असलेला रस्ता अरुंद करणे आहे त्याची चर्चा सध्या सोशल मीडियासह संपूर्ण व्यापारी वर्ग आणि स्थानिकांच्या मध्ये सुरू आहे. मात्र असं असलं तरी याठिकाणी असणारा दुभाजकासह मोठा रस्ता तो रस्ता कमी करून नवीन रस्ता बांधणे येतोय तो रस्ता जर बांधला गेला तर भविष्यात शृंगारतळी मध्ये किती अडचणी येणार आहेत. बाजारपेठेत पार्किंगची अडचण निर्माण होणार आहे. बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामांना पुन्हा एकदा बांधकाम करण्यासाठी सविस्तर जागा मिळणार आहे.याचा विचार होणे गरजेचे आहे.
स्वर्गीय सुशील अप्पा वेल्हाळ यांनी प्रशासनाच्या मागे लागून जो रस्ता रुंदीकरण दुभाजक टाकून तयार करून घेतलं होतं तो जुना रस्ता म्हणजे दोन्ही साईडने वाहतूक जाण्यासाठी बनवलेला तो जुना रस्ता कायमस्वरूपी निघून जाणार आहे. तेव्हा विचार करा खरंच येथील ग्रामस्थांना आणि व्यापाऱ्यांना हे रस्ता रुंदीकरण मान्य आहे का ???? असा प्रश्न आता निर्माण होत आहे. आणि जर जुना असलेला दुभाजक रस्ता बंद करून एक सिंगल रस्ता रुंदीकरण होणार असेल तर खरोखरच या भागावर वर्चस्व असलेले लोकप्रतिनिधी डोळे बंद करून झोपेचे सोंग घेत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
शुंगारतळी ही मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून स्वर्गीय सुशील (अप्पा )वेल्हाळ यांनी एन्रॉनच्या कालावधीत हा रस्ता रुंदीकरण करून दोन्ही बाजूंनी वाहतूक व्हावी म्हणून रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून घेतला होता.जेणेकरून शुंगारतळी मध्ये भविष्यात वाहतूक कोंडी होणार नाही. आणि व्यापाऱ्यांना आणि स्थानिकांना त्याचा कुठलाही फटका बसणार नाही. याची तरतूद केली होती. मात्र आता नव्याने होणारा रस्ता हा त्या जुन्या रस्त्यापेक्षा लहान असल्याने खरोखर रस्ता रुंदीकरण आहे या अनधिकृत बांधकामांना मोकळी वाट करून देणारा आहे याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले. स्थानिक लोकप्रतिनिधी ,आमदार,खासदार पुढारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते इतर संघटनांनी या रस्ता रुंदीकरण याबाबत आवाज उठवावा आणि जुना जो रस्ता होता तसाच रस्ता शृंगारतळी बाजारपेठेत रुंदीकरणात करून घ्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. तेव्हा उघडा डोळे पहा नीट अशी म्हणण्याची वेळ आता लोकप्रतिनिधींवर आले आहे ………..अजूनही वेळ गेलेली नाहीये लोकप्रतिनिधींनी तरी याबाबत आवाज उठवला तर शुंगारतळीतीळ सुरुवातीला असलेला जुना प्रशस्त आणि मोठा रस्ता होता तसाच रस्ता रुंदीकरण या ठिकाणी होऊ शकतो फक्त गरज आहे ती हे काम मी करीन किंवा मी करून घेईल असे म्हणण्याचे पाहूया काय होते ते……..
लक्ष्मीकांत (पिंट्या) घोणसेपाटील