शुंगारतळी बाजारपेठेत सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. मात्र या रस्ता रुंदीकरणामुळे खरोखरच शृंगारतळीचा विकास होणार आहे की शुंगारतळी बाजारपेठेत ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले त्यांचा विकास होणार आहे याची चर्चा सध्या संपूर्ण गुहागर तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे हे रुंदीकरण शृंगारतळीचा विकास नसून अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचा विकाससाठी होत आहे. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शृंगारतळी बाजारपेठ गुहागर तालुक्यातील महत्त्वाचे असे ठिकाण या बाजारपेठेवर परिसरातील जवळपास तीस ते चाळीस गाव ते अवलंबून आहेत. आणि याच शृंगारतळी बाजारपेठेत आपलं दुकान असावं, आपलं घर असावं ,आपला व्यवसाय असावा अस अनेकांना वाटतं त्यासाठी अनेकांनी चक्क बाजारपेठेत अनधिकृत बांधकाम केलेआहे. तर अनेक बिल्डरने अनधिकृत बांधकाम करून व्यावसायिक गाळे आणि राहण्यासाठी घरे प्लाट दिले आहेत. आणि यात महत्वाचे म्हणजे शृंगारतळी मध्ये शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडवून अनेकांनी खरेदीखत न करता फक्त नोटरी वर अनेक ठिकाणी व्यवसायिक गाळे आणि राहण्याचे फ्लॅट विकले गेल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत आणि आता तर या रस्ता रुंदीकरणआधी ज्यांनी गटारावर बांधकाम केली आहेत. त्यांची तर चांदीच झाली असल्याचे दिसून येते आहे.
आता नव्याने होणारे रस्ता रुंदीकरण याबाबत कोणताही लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना किंवा पुढारी बोलण्यासाठी पुढे येत नाही. कारण यात तेरी भी चूप और मेरी भी चुप असंच काहीस ठरल्याची चर्चा सुरू असून जे होते ते पाहत राहू अशीच भूमिका या परिसरातील अनेकांनी घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे शुंगारतळी तील हे रस्ता रुंदीकरण नक्की कोणाच्या फायद्याचं हे मात्र आगामी काळात नक्कीच तालुकावासीयांना कळेल हे मात्र तेवढेच खरं
आणि हो याआधी ज्यांनी पूर्वीच्या गटावर बांधकाम करून अनधिकृत बांधकाम केले त्यांना सुद्धा या नव्याने झालेल्या रस्त्यांमुळे आपण केलेले बांधकाम हे अधिकृत बांधकाम केले असल्याचे…….. जे मनातल्या मनात उकळ्या फुटतात किंवा आपलं बांधकाम अधिकृत झालं असेल त्याच्यावर शिक्का पडत आहे…….असं वाटतंय ……… त्या सर्व अनधिकृत बांधकाम व्यवसायिकांना व बिल्डरांना आणि व्यापाऱ्यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा
शृंगारतळी रस्ता रुंदीकरण ठरतंय अनधिकृत बांधकामांसाठी एक संधी…….
शुंगारतळीतील स्वर्गीय लोकनेते सुशील (अप्पा) वेल्हाळ आज जर या ठिकाणी असते तर हे रस्ता रुंदीकरण नक्कीच थांबवण्यात यशस्वी झाले असते आणि त्यांनी प्रयत्न करून जो शुंगारतळी मध्ये जो दुभाजक ठेवून मोठा रस्ता केला होता तेवढाच रस्ता शासनाच्या लक्षात आणून देऊन म्हणा किंवा ठेकेदाराच्या मानगुटीवर बसून म्हणा करून घेतला असता हे मात्र तेवढेच खरं
तेव्हा आप्पा तुमची आठवण पुन्हा एकदा शृंगारतळी वासीयांना येते हे आहे हे मात्र तेवढेच खरे…..
लक्ष्मीकांत (पिंट्या ) घोणसेपाटील🅿️🅿️✍️