नक्कीच कोरोनाचं भय आणि प्रमाण कमी होत आहे…..

0
308
बातम्या शेअर करा


कारण गेल्या महिनाभरात राज्यात पन्नास साठ कर्मचारी, अधिकारी लाच घेताना सापडले आहेत…नोटेद्वारा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती नाहीशी होण्यास त्यामुळे मदतच झाली आहे…
कोरोनासारख्या संकटाचा सामना करत ज्यांनी ज्यांनी आपले लाचखोरीचे व्रत चालू ठेवले आहे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे..तुमचा निर्धार पाहूनच कोरोना गुडघे टेकेल यात शंका नाही..तुमच्याबरोबर कोरोना औषधांचा , ऑक्सिजनचा आणि अन्य अत्यावश्यक सेवांचा काळाबाजार करणारे कर्मचारी, अधिकारी आहेतच…त्यामुळे कोरोनाची सुट्टी लवकरच होणार हे निश्चित..
फक्त एकच झालं तर खूपच छान होईल..काळाबाजार, भ्रष्टाचार करणाऱ्यांनाच त्याची लागण होते असं त्याचं वैशिष्ट्य असलं पाहिजे…असेल नसेल तेवढा काळा पैसा बाहेर काढल्याशिवाय कोरोनाने त्यांना सोडता कामा नये…यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी, पुढारी आणि मंत्री हेही ओघाने आलेच..कारण सर्वांच्या युती आणि आघाडी शिवाय हे कठीण व्रत पूर्ण करणे शक्यच नाही…या सर्वांमध्ये दलालांची, चामच्यांची भूमिकाही कमी महत्त्वाची नाही…एकंदर राज्यात काय किंवा देशात काय अशा स्वरूपाचा कोरोना पसरण्यास खूपच अनुकूल वातावरण आहे…
अशा भ्रष्ट , लाचखोर यांना या वैशष्ट्यपूर्ण कोरोनाची लागण झाली तर पीडित, सर्वसामान्य माणूस थाळ्या आणि टाळ्याच काय ढोलसुद्धा बडवेल…
मकरंद भागवत, चिपळूण


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here