निलेश सुर्वे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एक जरी उमेदवार निवडून आणला तरी मी पदाचा राजीनामा देईन – जितेंद्र चव्हाण

0
344
बातम्या शेअर करा

गुहागर – भाजपचे गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांना आ, भास्कर जाधव यांच्या निवडून येण्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. परंतु गुहागर, मतदारसंघातील तळागाळातील सामान्यांपासून कष्टक-यांपासून विचारवंतांपासून सगळ्यांचा भास्करराव भरपूर मताने निवडून येणार असा अंदाज आहे, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही तर जनतेनेच ते ठरवले आहे. राजेश बेंडल निवडून येणार हे आपलं स्वप्न स्वप्नच राहाणार आहे. यापुढे जाऊन सांगतो गुहागर मतदारसंघांमधून आमदार सोडाच पण पुढील येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एक जरी उमेदवार आपण निवडून आणला तर मी चिपळूण तालुकाप्रमुख पदाचा राजिनामा देईन उगाचच फुकाच्या बाता मारू नका, असा सल्ला शिवसेना उबाठा तालुका प्रमुख जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण यांनी भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांना दिला आहे.

आमदार भास्कर जाधवांनी नौटंकी बंद करावी- निलेश सुर्वे

आ. भास्करराव जाधव काय आहेत हे ओळखायला सुर्वेना दुसरा जन्म घ्यावा लागेल. आज आपलं वय किती, आपला राजकारणातला अनुभव किती याचा जरा विचार करा. या आधी स्व. तात्यासाहेब नातू यांचे गुण आपल्या संघटनेमध्ये राहिले आहेत का याचा जरा गांभीर्याने विचार करा. तात्या साहेबांची राहाणी, विचारसरणी किती उच्च होती. हे गुहागरमधील जनतेला माहित आहे आणि यापुढे आपलं आचरण कसं चालू आहे. हेही लोक पाहात आहेत. २००९ उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेला आपल्याच भाजप पक्षाला वरिष्ठ नेत्यांना कुठल्या भाषेमध्ये व कुठल्या पद्धतीने वागणूक दिली होती हे जरा आठवा. आपण म्हणता जाधव राष्ट्रवादीतून आमदार झाले व दमदाटी करून भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षांमध्ये घेतलं हे आपण धादांत खोटं बोलत आहात. भास्करावांची काम करण्याची पद्धत ‘एकादा शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची क्षमता’ आहे. ते आमदार झाल्यानंतर गुहागर मतदारसंघांमध्ये गावागावांचा दळणवळणांचा विकास होऊ लागला म्हणूनच साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून स्वतःहून भाजपचे कार्यकर्ते साहेबांसोबत पक्षात सामील झाले. आपण बोलता भास्करराव नातूंना काय पण बोलतात टिंगल टवाळी करतात मग एक प्रश्न आहे शृंगारतळी येथे नातू साहेबांच्या उपस्थितीमध्ये मागे जी जाहीर सभा झाली तेथे भाजपच्या एका नेत्याने खालच्या पातळीवर घरगुती वैयक्तिक जीवनावर टीका केली त्यावेळेला नातू साहेबांनी टाळ्या वाजवून दाद दिली हे शोभलं का, आपण कुणाचे सुपुत्र आहोत याचे तरी त्यांनी भान ठेवलं का, तुमचे कार्यकर्ते एकसंघ आहेत का की काही जण इंजिनामागे धावत सुटले आहेत, ते कशासाठी धावत आहेत हे आपणाला माहित आहे का? ते पहा मग आपण बोला. परत एकदा सांगतो भास्कररावांवरती टीका केली तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ आणि आपणाला खास निमंत्रण देतो २३ तारखेला आमच्या विजयामध्ये सामील होण्यासाठी आपण यावे, असेही चव्हाण यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here