गुहागर – दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवानांना तसेच सीमेवर लढणार्या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी गड किल्ले याचे संवर्धन करणाऱ्या शिवतेज फाऊंडेशन गुहागर व समस्त गुहागर वासियांच्या वतीने दिपावलीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी शहरातील गांधी चौक येथे एक दिवा शहिदांसाठी आणि भारतीय जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे.टिव्ही किंवा वर्तमानपत्रात बातम्या पाहून केवळ हळहळ व्यक्त न करता सर्व गूहागरवासीय जवानांप्रती असलेली कृतज्ञता व संवेदना व्यक्त करण्यासाठी कोणतेही राजकीय व सामाजिक अभिनीवेश न बाळगता एकत्र आले होते. ही बाब गुहागरवासीयांनी प्रत्येक वर्षी कृतीतून दाखवून दिली आहे. यावर्षी देखील मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबियांसोबत व मित्रपरिवारासहित या कार्यक्रमाला उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल, शिवतेज फाऊंडेशन चे अध्यक्ष ॲड. संकेत साळवी, पोलिस उपनिरीक्षक पवन कांबळे, सचिव निलेश गोयथळे, खजिनदार गणेश धनावडे, संचालक राजेंद्र आरेकर, संतोष वरंडे, विकास मालप, सुहास सातार्डेकर, अलंकार विखारे, राहुल कनगुटकर, अंकुश विखारे, माजी नगराध्यक्ष स्नेहा वरंडे, लायन्स क्लब, गुहागर अध्यक्ष शामकांत खातू, विश्वनाथ रहाटे, ज्ञानेश्वर झगडे, नगरसेवक प्रसाद बोले, माधव साटले, समीर घाणेकर, होमगार्ड तालुका समदेशक सुधाकर कांबळे, प्रभुनाथ देवळेकर, आरोग्य व स्वच्छता समिती सभापती स्नेहा रेवाले, बांधकाम सभापती वैशाली मालप, दिपक कनगुटकर, माजी सैनिक सुनील जाधव, दीपक सकपाळ, प्रताप शिर्के, प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय, गुहागर शाखेच्या शिल्पा बहेंजी, श्रद्धा घाडे, सारिका कणगुटकर, पारिजात कांबळे, शिवतेज परिवार व गुहागरवासिय उपस्थित होते. यावेळी शेकडो दिवे प्रज्वलित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे यांनी केले.