गुहागर – गुहागर तालुक्यातील काळसूर कौढर येथील मुख्य पुलाचे काम मंजूर होऊन सुमारे सहा महिने उलटले ठेकेदाराने कामाला सुरुवात केली.
मात्र, सुमारे तीन महिने हे काम बंद स्थितीत असून हे काम बंद का झाले? याबाबत ग्रामपंचायत काळसूर कौढर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांना लेखी पत्र दिले आहे. त्वरित काम सुरू न झाल्यास येथील ग्रामस्थ आक्रमक होणार असल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.गेले अनेक वर्ष काळसूर कौढर, झोंबडी मधून जाणाऱ्या गुरववाडी येथील पुलाचे काम शासनाकडे वारंवार मागणी करूनही होत नव्हते. या ठिकाणी असलेल्या नदीला बाराही महिने पाणी असते. पावसाळ्यामध्ये हि नदी दुतर्फा वाहत असते, त्यामुळे या पुलाची उंची वाढवू नवीन पूल मिळावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार या कामाला मंजुरीही मिळाली निधी उपलब्ध झाला. काम करण्यासाठी या नदीकिनारी बाहेरून माणसेही आणली होती. मात्र, हे काम गेल्या सुमारे तीन महिने बंद आहे सदरहू काम बंद असल्याने येथील जागरूक नागरिकांनी ग्रामपंचायत काळसूर कौढर यांच्याकडे विचारणा केली. त्याप्रमाणे ग्रामपंचायतीने ही याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांच्याकडे लेखी निवेदन दिले. सदरहू काम त्वरित सुरू करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे अशी विनंती केली. या वेळेस काम सुरू न झाल्यास आक्रमक पवित्रा घेतला जाईल असे ग्रामस्थांनी ठणकावले आहे.