गुहागर – राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसचा अपघात झाल्यास त्यामध्ये जखमी होणाऱ्या प्रवासी किंवा कर्मचाऱ्यांना तातडीने घटनास्थळी प्रथम उपचार मिळावे, यासाठी एसटीच्या गाडीमध्ये चालकास समोरील भागात प्रथमोपचाराची पेटी ठेवलेली असते.
यामध्ये आयोडीन पासून बँडेजपट्टी रक्तस्त्राव थांबविण्यासाठी औषधे तसेच इतर साधनांचा समावेश असतो. नवीन गाडी येते त्याच वेळी ही पेटी संबंधित औषधांनी भरलेले असते.मात्र, नंतरच्या काळात बहुतांशी गाड्यांमधील या प्रथम उपचाराच्या पेट्या एकतर शोभेच्या वस्तू बनवून रिकामे पडून राहतात. तर, बऱ्याचशा गाड्यांमधील पेटाऱ्यात गायब झालेल्या दिसतात. त्याचप्रमाणे, पावसाळ्यामध्ये प्रवाशांचे सामान सुरक्षित ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ताडपत्रे सुद्धा बसेस वरून गायब होत असल्याचे चित्र दिसत आहे. या ताडपत्रा प्रवाशांचे सामान सुरक्षित ठेवण्याबरोबरच गळक्या एसटी गाड्यांमधील प्रवाशांना होणारा अभिषेक थांबवण्यास मदत करतात.मात्र, लांब पल्ल्याच्या गाड्या वगळता जुन्या गाड्यांमधील ताडपत्री नाही गायब होत आहे. अनेक बसेस मधील आसणे फाटलेली आहेत. तर चालकांच्या बसण्याची असणे हे धोकादायक अवस्थेत आहेत. बहुतांशी एसटी गाड्यांना ब्रेक लाईट नाहीत. परिणामी रात्रीचा प्रवास करताना मागील गाड्यांना याचा फटका सहन करावा लागतो. याच घडीला रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता सर्व आगारा मधील 60% गाड्या या जुन्याच आहेत. आधी त्या खराब झालेल्या गाड्यांना प्रवासी वैतागले असताना, आता या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे ही महामंडळ दुर्लक्ष करीत असल्याने प्रवासी नाराज झाले आहे.