रत्नागिरी जिल्ह्यातील आठ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

0
216
बातम्या शेअर करा


चिपळूण- रशिया युक्रेन युद्धाची सुरुवात झाल्यानंतर भारतातील अनेकजण युक्रेनमध्ये अडकले आहेत. यात रत्नागिरी जिल्ह्यातून युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईंकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला असून, या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे. दरम्यान, हे सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे पालकांनी प्रशासनाला सांगितले आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील तीन तर चिपळूण, मंडणगड, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यातील एक अशा एकूण आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. युक्रेनमधील युध्दानंतर येथील परिस्थिती बदलत असली तरी जिल्ह्यातील विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती पालकांनी प्रशासनाला दिली आहे. परंतु विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे अशी विनंती पालकांकडून करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये अद्वैत विनोद कदम, साक्षी प्रकाश नरोटे, जान्हवी उमाकांत शिंदे, वृक्षभनाथ राजेंद्र मोलाज, आकाश अनंत कोगनाक, मुस्कान मन्सुर सोलकर, सलोनी साजीद मनेर, ऐश्वर्या मंगेश सावंत अशी या विद्यार्थ्यांची नावे असून यातील सहाजण एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला, एक विद्यार्थीनी दुसर्‍या वर्षाला तर एक विद्यार्थी तृतील वर्षाला शिक्षण घेत आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here