गुहागर – गुहागर तालुक्यातील तळवली गावात एका रात्रीत रस्त्याचे काम करून ठेकेदाराने इतिहास रचला आहे. येथील राजकीय नेत्यांनी आणि ठेकेदाराने नेमका कशासाठी हा आटापिटा केला? याची चर्चा आता ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे.
भर दिवसा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करणे आवश्यक असताना तळवली येथे मात्र ठेकेदाराने चक्क रात्रीत हे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याची खडी उखडली आहे. दर्जाहीन आणि रात्रीत काम होत असताना येथील राजकीय नेत्यांनी देखील ठेकेदाराला पाठबळ दिले आहे की कोणाच्या इशार्यावर ठेकेदार काम करत आहे, अशी चर्चा या कामानंतर रंगू लागली आहे.
















