कोकणातील सहकार चळवळीचे प्रणेते -सुभाषराव चव्हाण

0
804
बातम्या शेअर करा

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा .श्री सुभाषराव चव्हाण यांनी अल्पावधीतच संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणले एवढेच नव्हे तर बेरोजगार तरुणाचे ते आधारस्तंभ बनले आहेत,म्हणूनच त्यांची सहकार शिरोमणी व सहकार चळवळीचे प्रणेते अशी ख्याती आहे,कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात गौरवपूर्ण वाटचाल करणाऱ्या पतसंस्थेच्या माध्यमातून चव्हाण यांनी शेकडो तरुणाच्या हाताला नोकरी स्वरूपात रोजगाराचे साधन मिळवून दिले तर हजारो उद्योजक ,लघुउद्योजक यांना परिपूर्ण सहकार्य , मार्गदर्शन आणि कर्जपुरवठा करून आज मागील २७ वर्षाच्या वाटचालीत हजारो लोकांना त्यांच्या उद्योग,व्यवसायात त्यांनी स्वतःच्या पायावर उभे केले आहे,हेच परमेश्वर रुपी आशीर्वाद सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या मागे अखंडपणे आहेत, सहकारातून समाज परिवर्तन घडविणाऱ्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज जन्म दिवस

महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्या युगपुरुषांचे योगदान लाभले आहे. त्यात सहकार महर्षी यांचे स्थान फार वरचे आहे. सहकारी चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी समाजाला पत व प्रतिष्ठा प्राप्त करुन ग्रामीण अर्थकारण गतिमान करणारे अनेक सहकाराचे प्रणेते होऊन गेले असेच एक सहकार शिरोमणी म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहेत असे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्मानीय श्री.सुभाषराव चव्हाण साहेब सहकारातून समाज परिवर्तन घडविणाऱ्या आणि सहकार चळवळीत नेतृत्व करणाऱ्या महान व्यक्तीमध्ये चव्हाण साहेब यांचे नाव अग्रगण्याने घेतले जाते,
सुभाषराव चव्हाण यांचा जन्म हा कोकणातल्या ग्रामीण भागात असलेल्या उभळे ता.चिपळूण भागात झाला असल्याने शेतकऱ्यांचे दु:ख आणि वेदना त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत. ग्रामीण समाजाच्या विविध समस्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास करून. शेतकरी आणि शेतमजूराला आर्थिक स्थैर्य लाभल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नाहीत हे त्यांनी शालेय शिक्षण करत असतानाच जाणलं होतं.अर्थशास्त्र या विषयातून उच्चशिक्षण पूर्णकेल्यानांतर १५ सप्टेंबर १९७१ रोजी त्यांनी सहकारी बँकेत नोकरी सुरु केली आणि इथेच त्यांची नाल सहकार चळवळीशी जोडली गेली.
तेव्हापासूनच शेतकरी व सर्वसामान्य जनतेला या अर्थसंकटातून मुक्त करण्याची ठाम भूमिका त्यांनी स्विकारली. त्यांना व्यवहारीक अर्थशास्त्राची उत्तम जाण असल्याने आर्थिक स्थिरता लाभल्याशिवाय ग्रामीण भागाचे प्रश्न सुटूच शकत नाहीत. हे त्यांनी वेळीच चांगलेच ओळखले होते कोकणातील भौगोलिक परिस्थिती आणि एकपिकाची शेती लक्ष्यात घेता येथील शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पूरक उत्पन्न देणारी व्यवस्था केली पाहिजेत आणि त्यासाठी शेती बरोबरच छोटे मोठे व्यवसाय चालू करु इच्छिणाऱ्यांना गरजुंना सुलभ पद्धतीने अर्थपुरवठा करणारी व्यवस्था असायला हवी कि ज्या व्यवस्थेच्या माध्यमातुन बेरोजगारांसाठी रोजगार निर्मिती होईल असे सतत वाटतं होते म्हणूनच १९ ऑक्टोबर १९९३ रोजी चव्हाण साहेब यांच्या पुढाकाराने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना करण्यात आली या संस्थेने सुभाषराव चव्हाण साहेबांचा सहकारी जीवनाचा श्रीगणेशा झाला. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण नागरी सहकारी पथसंस्थेच जाळे निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.सुभाषराव चव्हाण साहेबांनी ग्रामीण भागातील आर्थिक परिवर्तन घडवितांना कष्टकरी समाजाच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. अनेक वर्षांच्या या काळातही आज ग्रामीण अर्थकारण सहकारी पथपेढी मुळेच अतिशय भक्कमपणे टिकून आहे हे त्यांनी सिद्ध केलं आहे.सुभाषराव चव्हाण साहेबांचे हे अद्वितीय कार्य पाहून महाराष्ट्रातील अनेक मातब्बर नेत्यांनी त्यांची व्यक्तिशः भेट घेऊन त्यांचे कौतुक आणि प्रशंसा केली आणि त्यांनी केलेलं कार्य पाहून भारावून गेले. अशी लाख मोलाची निवडक माणसे जर आपल्या राज्यात जन्माला आली. तर महाराष्ट्राचा आर्थिक विकास होण्यास फारसा वेळ लागणार नाही हे सर्वांनी मान्य केल आहे. क्रांतीकारक अर्थकारणाकडे यशस्वी झेप घेणारे सुभाषराव चव्हाण हे एक असामान्य आणि अलौकिक सहकार महर्षी आहेत यांच्या कार्याची महती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांना कोकणरत्न हा किताब बहाल करून त्यांना सन्मानित केले.
सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन सामान्य माणसापासूनचा असामान्य माणूस असा जो दैदिप्यमान प्रवास आहे तॊ भल्याभल्यांना तोंडात बोट घालून विचार करायला लावेल असाच आहे अश्या या कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाच्या या विशाल कर्तृत्वास आम्हा कर्मचारी वर्गाचा सन्मानाचा मुजरा अशी भावना कर्मचारी वर्गाने वाढदिवसाच्या पूर्व संध्येला व्यक्त केली आहे!!
आपण म्हणतो कि प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्यांच्या पत्नीचा वाटा ही तेवढाच असतो आणि त्याचप्रमाणे अगदी कठीण काळात सुद्धा आपल्या पतीच्या मागे हिमालयाप्रमाणे उभे राहून
आयुष्याच्या या प्रवासात ज्यांनी ज्यांनी साहेबांना आज पर्यंत साथ दिली त्या त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती स्मिता सुभाषराव चव्हाण यांच्या ही कर्तृत्वाची दाद दिली पाहिजे कारण संसार रुपी गाढा चालवत असताना पती आणि पत्नी ही त्या गाड्याची चाक जर एकमेकांना पूरक असतील तर त्यांच्या संसाराची यशस्वी वाटचाल शेवटपर्यत अविरत चालू राहते.
असे हे महान कर्तव्य पुरुष म्हणजे आमचे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था परिवाराचे आधारस्तंभ ,मार्गदर्शक, आधारवड आपल्या मुलाप्रमाणे कर्मचारी वर्गावर प्रेम करणारे
सर्वांचे सुभाषराव चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा आई तुळजाभवानी चिपळूणचे आराध्य ग्रामदैवत श्री.देव कालभैरव देवी जोगेश्वरी देवीच्या कृपेने साहेब आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो हीच मनोभावे प्रार्थना आणि उदंड शुभेच्छा..

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो.तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच आई जगदंबे चरणी माझी प्रार्थना

सौ.स्वप्ना प्रशांत यादव
मुख्य कार्यकारी अधिकारी
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था कर्मचारी वर्ग


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here