बातम्या शेअर करा

रत्नागिरी – राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊन कालावधीत मुंबई, पुणे, ठाणेसारख्या मोठ्या शहरात जाऊन रत्नागिरी विभागातील चालकांनी विशेष कामगिरी बजावली. असे असतानाही कोरोनाच्या या अशा परिस्थितीत गेले दोन महिने कर्मचाऱ्यांकडून विनामोबदला सेवा सुरु आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असून, त्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळवून द्यावेत अन्यथा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेतर्फे २० ऑगस्टपासून विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा विभागीय सचिव संदेश सावंत यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन विभाग नियंत्रक सुनील भोकरे यांना देण्यात आले आहे. यावेळी विभागीय अध्यक्ष राजेश मयेकर, खजिनदार अनिल चव्हाण तसेच संघटनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here