बातम्या शेअर करा

रत्नागिरी – मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली होती,यावेळी अनेक रहिवाशी भागात देखील पाणी साचले होते,परिणामी ज्या भागात पुराचे पाणी शिरले होते त्या भागात तातडीने साथ रोग नियंत्रक फवारणी करावी अशी मागणी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा चे मुझम्मील काझी यांनी केली आहे.
अनेक गावांमध्ये पुर परिस्थितीजन्य स्थिती होती. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या पुरातुन कचरा व तसेच अन्य प्रकारचा कचरा मानवी वस्तीत शिरला असुन तो तसाच पडुन आहे. प्रशासनाने जाहिर केलेल्या पुर बाधित क्षेत्रात वेळीच फवारणी करणे गरजेचे असल्याचे मुझम्मील काझी यांनी म्हटले असून आधीच कोरोनासारख्या आजाराची भिती असतानाच आता या पुराच्या घाणीमुळे डासांची निर्मिती होऊन डेंग्यु, मलेरिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागू शकते अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.वेळीच परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन प्रशासनाने पुर भरलेल्या भागात साथ रोग नियंत्रक फवारणी करावी, अशी मागणी मुझम्मील काझी यांनी गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने प्रशासनाकडे केली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here