मुंबई – कोकणातील सर्वात महत्वाचा अश्या गणेश चतुर्थीसाठी कोकणात एसटीने जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पासची गरज लागणार नाही. तसेच त्यांना कोकणात गेल्यानंतर दहा दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. असे रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
कोकणातील चाकरमान्यांनसाठी एसटी बुकिंगची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे.मात्र संबंधित चाकरमान्यांना कोकणात गेल्यानंतर दहा दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. तर १२ ऑगस्ट नंतर जाणाऱ्यांना कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा चाचणी अहवाल दिल्यानंतरच गावी जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे.असा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिला आहे.