बातम्या शेअर करा

गुहागर – जामसुत येथे शासनाच्या योजनेतून बांधलेल्या नवीन ग्रामपंचायतच्या इमारतीचे उद्घाटन होण्याआधीच त्या ग्रामपंचायतला इमारतला तडे गेल्याने ही ग्रामपंचायत इमारत नवीन आहे की जुनी आहे.? असा प्रश्न पडला आहे. त्यातच ही इमारत गावातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याने बांधली असल्याने ‘तेरी भी चुप और मेरी भी चुप असे समजून सर्वजण गप्प आहेत.

गुहागर तालुक्यातील जामसुत येथे जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत
14 लाख 87 हजार रुपये खर्च करून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधण्यात आली ही इमारत बांधून एक वर्ष पूर्ण झाले मात्र काही कारणास्तव तिचे उद्घाटन अद्याप झालेले नाही. मात्र या पावसाळ्यात या नूतन इमारतीला तडे गेल्याने या इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे समोर आले आहे. 14 लाख 87 हजार रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत गावचे सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली बांधली गेली आहे. त्यामुळे गेल्या वर्षाभरापूर्वी बांधलेली ही इमारत या पावसाळ्यात तडे जाऊन निकृष्ट दर्जाची असल्याचे सिद्ध झाल्याने गावचे सरपंच या इमारतीकडे दुर्लक्ष का करतात ? एवढ्या मोठ्या रक्कमेची बांधकाम केलेल्या इमारतीला अशा प्रकारे तडे गेलेले असताना गावचे सरपंच मुग गिळून गप्प का असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.

जामसुत येथील ही नूतन इमारत बांधून वर्ष झाले मात्र यावर्षी नेहमीपेक्षा पाऊस कमी असताना या कमी पावसात सुद्धा या इमारतीला तडे गेल्याने ठेकेदाराने हे बांधकाम निकृष्ट केल्या त्याठिकाणी समोर आले. मात्र असे असतानाही याच गावचे प्रमुख म्हणून असलेले ग्रामपंचायत सरपंच यांनी याबाबत अद्याप कोणतीही दखल न घेतल्याने ठेकेदार आणि सरपंच यांच्यात काहीतरी देवाण-घेवाण झाल्याची चर्चा सुद्धा याठिकाणी ग्रामस्थांमधून चर्चिली जात आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन या निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करतात.

या नूतन ग्रामपंचायत इमारतीची पाहणी केली असता तडे गेल्याचे लक्षात आल्यावर त्या ठिकाणी काम करणाऱ्या त्या स्थानिक ठेकेदार संतोष सावंत याला ते काम पुन्हा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्या कामाचे फायनल बिल न काढता अध्याप तीन लाख रुपये देण्याचे बाकी ठेवण्यात आले असुन ग्रामपंचायत निधीतून हे काम होत असल्याने हे काम पुन्हा करून घ्यावे असे सरपंच यांना सांगितले आहे असे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता ढगे यांनी सांगितले.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here