राजापूर – राजापूर तालुक्यातील भू येथे एबी स्वीच बदलण्याचे काम करणाऱया वायरमनचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली. सुनिल यशवंत चौगुले असे मयत वायरमनचे नाव आहे.
राजापूर तालुक्यातील महावितरण विभागामध्ये कंत्राटी पध्दतीवर वायरमन म्हणून सेवा बजावणारे कोतापूर येथील सुनिल यशवंत चौगुले आज दुपारच्या सुमारास भू येथे एबी स्वीच बदलण्याचे काम करत असताना त्यांला विजेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर त्यांना तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत माहिती मिळताच महावितरणच्या कर्मचाऱयांन मधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
