रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथे आज झालेल्या बस आणि टँकर अपघातात अद्यापही वाहतूक ठप्प आहे. टँकर मधून गॅस लिकेज होत असल्यामुळे ही वाहतूक थांबवण्यात आली आहे. जवळपास 10 तासांचा कालावधी लोटला तरी अद्यापही मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक ठप्पच आहे. सध्या या महामार्गावरील वाहतूक उक्षी मार्गे वळवली आहे.
मुंबई – गोवा महामार्गांवर निवळी घाटात गॅस टँकरची ट्रॅव्हल्सला धडक
आजच्या या अपघातातील टँकर मधून गॅस मोठया प्रमाणात लिकेज झाला आहे. तसेच या गॅसने पेट घेतला आहे. मात्र उर्वरित गॅस दुसऱ्या टँकर मध्ये भरण्यात येत आहे. मात्र कोणताही अनर्थ होऊ म्हणून खबरदारी म्हणून ही वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सकाळपासून वाहतूक ठप्प झालेली असल्यामुळे 6-7 किलोमिटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्ग वाहतूक पोलिसाची यामध्ये दमछाक झाली आहे.मात्र उक्षी घाट वळणाचा असल्यामुळे वाहने मोठया प्रमाणात या मार्गावरून जात असल्यामुळे येथेही वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या अपघातात मंदा खाडे ,मीना शिरकर हे गंभीर जखमी असून त्यांना परकार हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तर चिपळूण मधील 31 जण जखमी आहे. यामध्ये संतोष जागुष्टे (28), विराज राजाराम सावंत (41,) , मंदार खाडे (53), स्मिता पाटील (48), उषा खुडे (38), जयश्री गावडे (54), प्रियंका जाधव (38), स्नेहा मिस्त्री (47), धर्मेंद्र देरुगडे (53), दिलीप डोंगरे (53), सुलक्षणा पाटील (40), निशिकांत वानरकर (51), रुपाली यादव (50), हर्षाली पाकळे (36), निता बांदरे (38), मिना घाडगे (52), कमल महाडिक (37), प्रेमकुमार बबन शिवगण (35), अमोल कोनवाल (35), मनिषा कांबळे (47), मालिनीचव्हाण (40), श्वेता चव्हाण (48), यादव (47), गणेश सावर्डेकर (45), सुरेंद्र सावंत (50), सचिन पोकळे (43), उदय खताते (52), अरविंद सकपाळ (57), मिना शिरकर (38) आणि रोहित चव्हाण (35) या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत.