मुंबई- गेट वे ऑफ इंडियाजवळ एक प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर ७७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. अपघातावेळी या बोटीत ८० प्रवासी होते. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुडाली.
प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्यांकडे जात होती. तेव्हा एका स्पीड बोटीने नीलकमल फेरीबोटला धडक दिली. या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली. या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती आणि अपघातावेळी बोटीत ८० प्रवासी होते. या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर येत आहे. ज्यात प्रवासी बोटीला एका स्पीड बोटीने धडक दिली त्यानंतर प्रवासी बोट नीलकमल नावाची बोट उलटली. दरम्यान ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पीड बोटीने आधी नीलकमलला एक राऊड मारला आणि त्यानंतर थोडी लांब जाऊन पुन्हा परत येताना तिला थेट येऊन धडक दिली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
स्पीड बोटीने जेव्हा प्रवासी बोटीला धडक दिली तेव्हा त्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला. ही धडक इतकी जोरात होती की ज्यामुळे प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले.