बातम्या शेअर करा

दापोली – प्रेमविवाह म्हणजे एकमेकांच्या पसंतीनं केलेलं लग्न. एकदा का प्रेमविवाह झाली की, त्यांचा संसार अत्यंत सुखाचा असेल अशी अनेकांची खात्री असते. पण दापोलीमध्ये एक धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला आहे. ओणीमध्ये एका तरूणानं आपल्या प्रेमविवाह करून बायकोलाच चारित्र्याच्या संशयावरून पेटवून दिलं आहे. ती सध्या जखमी अवस्थेत रूग्णालयात उपचार घेत आहे. प्रेमविवाहात असं काही होऊ शकंत का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

पोलीसांनी या प्रकरणी संशयीत आरोपी शितेश विश्वनाथ औणकर आणि प्रतिभा विश्वनाथ औणकर या दोघांना अटक केली आहे. शितेशनं आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण केली. तेवढ्यावरच न थांबता तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला काडीपेटीनं पेटवून दिलं. या घटनेमध्ये विवाहितेच्या डोक्यावर, छातीवर, पोटावर, हातावर व उजव्या पायाच्या मांडीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेनंतर दापोलीमधून संतापाची लाट उसळत आहे. आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. पोलीस उपअधीक्षक प्रवीण पाटील यांनी या घटनेप्रकरणी घटना स्थळी पाहणी केली आहे. या प्रकरणाचा तापस पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here