रत्नागिरी – चिपळूणच्या अनेक महत्त्वाच्या विकास कामात ज्यांनी तहसीलदार पदी असताना महत्त्वाची कामगिरी बजावली असे जीवन देसाई यांची उपविभागीय अधिकारी रत्नागिरी या पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
याआधी जीवन देसाई यांनी सिंधुदुर्ग , लातूर , अलिबाग आधी ठिकाणच्या महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.सर्वसामान्य नागरिकांना समजावून घेत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीने सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळण्यास मदत होते अशा या व्यक्तीची उपविभागीय अधिकारी रत्नागिरी या पदी निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.