चिपळूण – काँग्रेसचे नेते व खासदार राहुल गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमांतून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेत आहेत.
ही यात्रा चिपळूणातील जनतेला समजावी, या उद्देशाने रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेच्या लाईव्ह एलईडी व्हॅनचा शुभारंभ चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी युवक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय रेडीज, जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख महादेव चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते सुरेश पाथरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते इब्राहिम दलवाई, डाॅ. दिपक विखारे, ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष प्रकाश सावळी, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, तालुका सरचिटणीस नंदू कामत, माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, चिपळूण तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अन्वर जबले, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस खलील सुर्वे, रत्नागिरी जिल्हा पर्यावरण सेलचे अध्यक्ष किरण तायडे, रत्नागिरी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष गुलजार कुरवले, माजी नगरसेवक कबीर काद्री, माजी नगरसेवक सुरेश राऊत, मैनुद्दीन सय्यद, चिपळूण काँग्रेस शहर उपाध्यक्ष राकेश दाते, चिपळूण तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष रूपेश आवले, खेड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्वराज गांधी, रत्नागिरी जिल्हा महिला काँग्रेस उपाध्यक्ष रविना गुजर, माजी नगरसेविका सफा गोठे, माजी उपनगराध्यक्ष गौरी रेळेकर, रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसच्या लिगल सेलच्या अध्यक्षा स्मिता कदम, पूर्वा आयरे, मिलन गुरव व तमाम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी प्रस्तावना करताना भारत जोड़ो यात्रेचे महत्त्व सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्या त्यांचे प्रश्न समजून घेतले जात आहेत असे नमूद केले. कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अल्पेश मोरे, प्रवक्ते यश पिसे यांनी केले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसचे प्रवक्ते यश पिसे यांनी समारोप करून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.