गुहागर – गेली अनेक वर्ष मागील काँग्रेस प्रणित केंद्र सरकारने आणि त्याआधी ज्यांनी ज्यांनी सत्ता हातात मिळाल्यानंतर रस्ते जोड प्रकल्प नद्या जोड प्रकल्प असे अनेक प्रकल्प नुसते कागदावर घेतले होते.
त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी किती प्रमाणात झाली हा प्रश्न जनतेला आजही सतावत आहे.याच अनुषंगाने दापोली तालुका आणि गुहागर तालुका जोडण्याचा मनसुबा तत्कालीन सरकारने जाहीर केला. परंतु आज पर्यंत फक्त या विषयाच्या वलग्न करण्यात येत असून प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्या मुळे महाराष्ट्राला लाभलेले प्रत्येक सरकार हे मग कोणत्याही पक्षाचे असो ते निष्क्रिय असल्याचे या दोन तालुक्यातील जनतेच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.जवळपास 25 वर्षांपासून गुहागर आणि दापोली हे दोन तालुके जोडण्याची कल्पना होती. परंतु आजपर्यंत राज्याचा कारभार करणाऱ्यांनी ही योजना अमलात आणली नाही. त्याचे कारण काय असेल ते फक्त राजकारण्यांनाच माहीत असेल पण यादरम्यान या दोन तालुक्याचा मिलाप घडवण्यासाठी डॉक्टर मोकल यांना फेरीबोटसाठी परवाना देण्यात आला. त्यामुळे या तालुक्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुंबई मार्गे येणाऱ्या पर्यटकांचा मार्ग अतिशय सुखकर झाला. मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांना पेन पनवेल महाड खेड चिपळूण असा प्रवास करून यावे लागते. त्यामध्ये इंधन वाया जातेस आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात वेळ वाया जातो. त्यामुळे हा मार्ग झाल्यास पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांनाही याचा फायदा होणार आहे त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.धोपावे व दाभोळ खाडी पूल प्रस्तावगुहागर दापोली या दोन तालुक्यांना जोडणारा पूल आजही प्रस्थापित आहे. परंतु त्याकडे स्थानिक पुढारी कोणीही मनापासून लक्ष घालत नसल्याने ही खेद जनक बाब आहे. गुहागर तालुक्यातील परचुरी फरारी उनवारे असा महामार्ग होणार होता. पण तोही फोल ठरला. धोपवे आणि दाभोळ या दोन गावांमध्ये भली मोठी खाडी आहे याच खाडीवर पूल बांधण्याचे ठरवले. हे दोन तालुके जोडण्याचा बेत होता परंतु यापैकी शासनाचा कोणताही माणूस पूर्ण झालेला नाही.या खाडीवर पूल झाल्यास मुंबई गोवा महामार्गाने जाणाऱ्या प्रवाशांचे सुमारे 50 ते 60 किलोमीटर वळसा वाचणार या सर्व बाबींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष पुरवणे गरजेचे असल्याचे मत जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच हे काम कधी मार्गे लागतील याची प्रतीक्षा आहे.