रत्नागिरी ; १६ लाखाहून अधिक लोकांचा भार केवळ १,५१३ पोलिसांवर

0
57
बातम्या शेअर करा

गुहागर – रत्नागिरी जिल्ह्याची वाढती लोकसंख्या विचारात घेता जनतेच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिस बळ अपुरेच पडत आहे. १६ लाखाहून अधिक लोकसंख्या असतान पोलिस मनुष्यबळ केवळ १ हजार ५१३ एवढेच आहेत. सुमारे अकराशे लोकामागे १ पोलिस अशी गंभीर स्थिती जिल्ह्यात आहे.

जिल्ह्यात पोलिस दलात मंजूर असलेल्या १ हजार ७४० पदांपैकी २२७ पदे रिक्त आहेत. त्यामध्ये अधिकाऱ्यांचीच २९ पदे रिक्त असल्याने प्रभारींवर अनेक ठिकाणी कारभार सुरू आहे. यामुळे जनतेच्या सुरक्षिततेचे गणित जुळविताना पोलिस दलाची फरफट होत आहे.वाढती गुन्हेगारी कमी करण्यासह सण, उत्सव काळातील बंदोबस्त, आंदोलन, सुरक्षा, अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाया, जिल्ह्यात निघतअसलेले विविध मोर्चे यांसह अन्य कारणांसाठी पोलिस मनुष्यबळ द्यावे लागते. एकीकडे कामाचा ताण वाढत असताना जिल्ह्यात पोलिसांची विविध वर्गांची २२७ पदे रिक्त आहेत. यामुळे कामाचा ताण अधिक, अनेकांना सुट्ट्या मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानसिकता ढासळत आहे.पोलिस भरती गेल्या दोन वर्षांत झाली असून विचित्र राजकीय घडामोडीमुळे भरती रखडली आहे. येत्या काळात पोलिस भरती करून रिक्त जागांवर पोलिस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याची गरज आहे. बंदोबस्तासह विविध गुन्ह्यातील तपासासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना परराज्यात पाठवण्याची गरजही वाढली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here