रत्नागिरी – ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सोय होऊन विजेचीही बचत व्हावी म्हणून शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना सौरदिव्यांचा लाभ देण्यात आला होता.
मात्र आजजमितीस यापैकी 80 टक्के सौरदिवे बंद स्थितीत असून त्यांची दुरवस्था झाली आहे त्यामुळे योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च वाया गेला.ग्रामीण भागातील रस्त्यांवर प्रकाशाची सुविधा उपलब्ध करून विजेची ही बचत व्हावी शासनाने पथदिपंची योजना आखली होती. या योजनेअंतर्गत गावामध्ये सौर दिवे लावण्यात आले. मात्र काही दिवसातच स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे सौरऊर्जेचे दिवे बंद पडले आता फक्त शोभेच्या वस्तू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते या योजनेसाठी शासनाने खर्च केलेले पैसे वाया गेले आहेत.शासनाच्या पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अंतर्गत जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायतींना या योजनेतून सौर दिव्यांचा लाभ देण्यात आला होता. जिल्ह्यातील विविध गाव खेड्यातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत कार्यालय परिसर गावातील चौकात असे जिल्हाभरात 20 हजार हून अधिक सौरदिवे लावण्यात आले होते. मात्र स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या दुर्लक्षामुळे या सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीस जाणे, खांब तुटून पडणे, सौर प्लेट खराब होणे, अशा अनेक कारणांमुळे आजजमितीस ८० टक्के सौरदिवे गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद पडले आहे. लहानात लहान असलेल्या एका सौर दिव्याच्या संचासाठी वीस हजार पाचशे रुपये खर्च येतो तर दिव्यांच्या मोठ्या संचासाठी एक लाख रुपये पर्यंत खर्च येतो.तर काही सौर दिव्याच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. तर काही नादुरुस्त झाल्या आहेत पावसाळ्यात अनेक खांब गंजून गेले आहेत. अनेक ठिकाणी सौर दिव्याची वातहात झाली आहे सौर वीज निर्माण करणाऱ्या काचेच्या प्लेट तुटून पडलेले दिसून येत आहे.