रघुवीर घाटात परत दरड कोसळली,काही दिवसातली तिसरी घटना

0
78
बातम्या शेअर करा

खेड – रघुवीर घाटात मोठी दरड कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्हा आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. हा घाट खेडमध्ये येतो. याच घाटात मोठी दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेमुळे सातारा जिल्ह्यातील 20 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. सातारा जिल्ह्यातील 20 गावांना संपर्कासाठी असणारा हा एकमेव रघुवीर घाट आहे विशेष म्हणजे गेल्या 15 दिवसांतील ही तिसरी घटना आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून नागरिकांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्मण होण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या गावांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here