गुवाहाटी – मी आजही शिवसेनेसोबतच आहे. पण बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मविआतील मित्र पक्षांच्या वागण्यामुळे वाईट नजर लागली आहे.
त्यातून शिवसेनेला बाहेर काढण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळेच त्यांच्या समर्थनार्थ मी गुवाहटीत आलो आहे, असे आमदार उदय सामंत यांनी सांगितले.राज्यसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेकडून पुरस्कृत आमदार म्हणून तिकीट देण्यात येणार होतं. पण त्यानंतर एका सामान्य शिवसैनिकाला शिवसेनेने तिकीट दिलं. त्या शिवसैनिकाला राज्यसभेत कसं जाता येणार नाही याचा संपूर्ण बंदोबस्त काँग्रेस-राष्ट्रवादीने केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.