गुहागर – राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा साहिल आरेकर यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेच्या माध्यमातून गेली नऊ ते दहा वर्षे साहिल आरेकर कार्यरत आहेत.
सन २०१२ ते २०१४ त्यांनी गोगटे महाविद्यालय रत्नागिरी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉलेज कमिटी अध्यक्ष, त्यांनतर २०१६ ला राष्ट्रवादी विद्यार्थी काँगेस रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष त्यांनतर २०१८ पासून पाच वर्षे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पदावर ते काम करत आहेत तसेच गुहागर मध्ये आमदार भास्कर जाधव यांच्या सेना प्रवेशावेळी विक्रांत जाधव यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून साहिल आरेकर यांची ओळख असतांना त्यांनी शिवसेना प्रवेश न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच रहाण्याचा निर्णय घेतला तसेच अनेक वर्षे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी सेलचे प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे त्यामुळे आता नवीन कार्यकर्त्यांना त्या सेलमध्ये आणि पदावर काम करण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी साहिल आरेकर यांनी त्यांचा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभागाचे अध्यक्ष किरण शिखरे यांच्या कडे सुपूर्त केला आहे तसेच आपण नवीन कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी वरिष्ठांना केली आहे असे स्पष्टीकरण साहिल आरेकर यांनी केले आहे.