चिपळूण – मराठवाड्यातील नांदेड – पनवेल ही रेल्वे गाडी पनवेलपर्यंत येत आहे. तीच गाडी पुढे रत्नागिरीपर्यंत आणावी, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली होती.
या मागणीला जवळजवळ मान्यता मिळाली असुन रेल्वेचे अधिकारी रेल्वेमार्गाची पाहणी करुन सिग्नलचे नियोजन करुन नांदेड वरुन येणारी गाडी सध्या पनवेल पर्यंत येत आहे.तीच गाडी रत्नागिरीपर्यंत आता काही दिवसात येणार आहे. यामुळे नांदेडशी कोकण रेल्वे मार्ग जोडले जाणार आहे. शासनाचे बरेचशे अधिकारी नांदेड येथुन कोकणामध्ये नोकरीसाठी कार्यरत आहेत. त्यांना ही गाडी सोईची ठरेल. कोकण रेल्वे मार्ग हा नांदेडशी जोडला जाणार आहे. यामुळे विकासालाही चालना मिळेल चिपळूण कराड रेल्वे मार्ग जोडले जावे, असेही प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिली आहे.