आता एनडीआरएफच्या 9 तुकड्या या 7 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्वी तैनात होणार

0
54
बातम्या शेअर करा

मुंबई – केरळमध्ये मान्सून दाखल होतात आता महाराष्ट्रातही कोकण आणि अन्य भागात मान्सूनचे आगमन होतआहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सूनदरम्यान नैसर्गिक दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढतेय. मात्र या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी वेळीत मदत आणि बचावकार्य सुरु पोहचवण्यासाठी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यंदा पावसाळ्यात संभाव्य आपत्ती निवारण्यासाठी एनडीआरएफच्या 9 तुकड्या 7 जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्वी तैनात करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य आपत्ती व्यवस्थापनेने केली आहे. त्यामुळे राज्यात मान्सून दरम्यानच्या दुर्घटनाग्रस्त ठिकाणी आता एनडीआरएफच्या टीमला वेळेत पोहचण्यास मदत होईल. ठाणे, मुंबईत प्रत्येकी दोन तर कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, पालघर येथे प्रत्येकी एक टीम 15 जूनपासून तैनात केली जाणार आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here