बातम्या शेअर करा

चिपळूण – गेल्या वर्षी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे हाहाःकार माजला . अतोनात हानी होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता . अशा नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देण्यासाठी आता चिपळूणमध्ये तीन भोंगे ( अलार्म सिस्टीम ) वाजणार आहेत .

पहिला भोंगा पुराचा इशारा , दुसरा धोक्याची पातळी ओलांडणारा आणि तिसरा भोंगा तो परिसर सोडण्याचा असणार आहे , ”अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ . बी . एन . पाटील यांनी दिली . चिपळूणमध्ये महापूर आला . ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने काही तासांत शहरामध्ये पूररेषेच्या वर दीड ते दोन फूट पाणी भरले . अचानक भरलेल्या पाण्याने हाहाकार माजला . अनेकजण घरातच अडकले . त्यात, कोरोना महामारी सुरू असल्याने उपचारांसाठी दाखल असलेले अनेक रुग्णही वाहून गेले . काहींचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला . आपत्कालीन यंत्रणादेखील तेवढी सतर्क नसल्याने मदतकार्यात अनेक अडथळे आले . काही खासगी संस्थांनी पुढाकार घेऊन घेऊन बचावकार्याला सुरवात केली . प्रशासन , पोलिस दल , स्थानिक , अन्य संस्था आदींच्या सहकार्याने मदतकार्य सुरू झाले . गेल्या वर्षी , २२ जुलैला व्यापारी , दुकानदार , अन्य व्यावसायिकांचे यात मोठे नुकसान झाले . अनेक वाहने पाण्याखाली गेल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले , कागदपत्रे वाहून गेली . या भयानक परिस्थितीतून अजूनही चिपळूणकर सावरलेले नाहीत . यंदाही लवकर आणि चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे . त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून विविध उपाययोजना आखल्या आहेत . आपत्कालीन यंत्रणाही सज्ज ठेवली आहे . अनेकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे .


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here