कोकणात फिरायला जाताय तर सावधन ……

0
185
बातम्या शेअर करा

चिपळूण – कोकणात फिरायला जाताय तर सावधन रहा. नाहीतर होईल फजिती…मोठा मनस्ताप! कारण कोकण फिरायला म्हणून जाल आणि मानसिक त्रास करून याल.अवकाळी पडलेल्या पावसात जर अशी अवस्था असेल तर भरपावसात काय स्थिती होईल याचा विचार या दयनीय परिस्थितीतून आणि या फोटोसदृश मधून दिसून येते.


मुंबई गोवा महामार्ग म्हटलं की प्रवासातील आनंद आणि कोकण पहायच म्हणून इच्छा अनावर होते. पण जेव्हा प्रवासाला जातो तेव्हा दळणळणसाठी रस्ते उत्तम असतील तर मज्जा येते .आजस्थितीला कोकणचा महामार्ग छान असेल म्हणून आणि पावसाळ्यात कोकण दर्शनचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही येणार असाल तर आधी कोकणचा मुंबई गोवा महामार्ग झक्कास, गुळगुळीत आहे का याची खात्री करा अन्यतः तुमच्या गाड्यांची नादुरुती आणि तुमची हाड खिळखिळी होऊ नये याची काळजी घ्या.
दुचाकीवरून प्रवास करताना तर विशेष काळजी घ्या
पहिल्याच अवकाळी पावसात संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते चिपळूण मार्गावर अनेक खड्डे पडले आहेत. चिखलाचे साम्राज्य बनले आहे. जोड रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे चारचाकी बरोबरच विशेषतः दुचाकी घेऊन जाणाऱ्यांनी व बाईक रायडिंग साठी येणाऱ्या नी विशेष काळजी घ्यावी. महामार्ग विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील तातडीने लक्ष द्यावे, हा रस्ता दुरुस्त करावा व अपघात टाळावेत अशी मागणी प्रवासी, वाहनधारक यांच्यातून होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्रच सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी रस्ता उखडून ठेवलाय अर्धवट रस्त्यांची खोदाई झाली आहे. तर काही ठिकाणी गटारे ही बांधलेले नाहीत अशा परिस्थितीत या रस्त्याची अवस्था आहे त्यामुळे सर्वप्रथम रस्त्यांची माहिती घ्या आणि मगच आपल्या प्रवासाला सुरुवात करा.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here