अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे ! उद्या पासुन लालपरी रस्त्यावर

0
1139
बातम्या शेअर करा

गुहागर – गेले पाच महिने सुरू असलेला एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला असून सोमवारी 18 एप्रिल पासून सर्व कर्मचारी कामावर रुजू होणार असल्याने जिल्ह्यात तब्बल ५ महिने १० दिवसानंतर लाल परी पूर्ववत होणार आहे.यामुळे गेले पाच महिने अनंत हाल-अपेष्टा भोगणार्‍या आणि अडचणींना सामना करणाऱ्या सर्वसामान्य जनतेला त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

सोमवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात एसटीची वाहतूक पूर्ववत होणार आहे.दिवाळीनंतर राज्यभरातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे गोरगरिबांची लालपरी ठप्प झाली होती. त्यामुळे खेड्यापाड्यातील प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. अनंत अडचणींना सामोरे जात गेले पाच महिने गोरगरीब प्रवासी खिशाला चाट देऊन मिळेल त्या वाहनाने आपल्या कामासाठी शहरात किंवा दुसऱ्या गावी जात होते. एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणही कोलमडले होते आता संप मिटल्याने या त्रासातून सामान्य जनतेची सुटका होणार असल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. सोमवारी 18 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी कामावर रुजू होतील, असा निर्णय कर्मचारी संघटनांच्या बैठकीत झाला असल्याची माहिती कामगार संघटनेच्या नेत्यांनी पत्रकारांना दिली. आता सोमवार पासून एसटीची वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू होणार असल्याने एसटी प्रशासनाने देखील पूर्ण नियोजन केले आहे.पाच महिन्यांपासून अधिक कालावधीसाठी असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून मागे घेण्यात आला आहे. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या आरोग्याचे प्रमाणपत्र घेऊन एसटी आगारात उपस्थित राहायचे आहे, तर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी येथे मुख्य कार्यालयात हजर होऊन नंतरच आपल्या आगारात कार्यरत व्हायचे आहे.


बातम्या शेअर करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here