रत्नागिरी-विविध वस्तूंबरोबरच रत्नागिरी हापूसही ऑनलाईन मार्केटींग करणार्या कंपन्यांकडून विक्री केला जात आहे. त्यात अॅमेझॉन कंपनीही उतरली आहे. थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला अॅमेझॉनने सुरवात केली आहे.
रत्नागिरीतील मिरजोळे एमआयडीसीमध्ये आंबा संकलन केंद्र चालू केले असून आरंभीलाच १२ शेतकर्यांकडून ६०० डझन आंब्याची खरेदी केली आहे. १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ प्रतिडझन ९०० रुपयांनी खरेदी करण्यात आले.रत्नागिरीतील आंबा संकलन केंद्राचे उद्घाटन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक मिलिंद जोशी, आंबा बागायतदार समीर दामले, यांच्यासह बागायतदार उपस्थित होते. हे अॅमेझॉनचे महाराष्ट्रातील चौथे तर भारतातील सातवे संकलन केंद्र आहे. येथे आंबा बागायतदारानं कडून आंबा विकत घेऊन मुंबई तसेच पुणे येथील ऍमेझॉनच्या ग्राहकांना पोहचवला जाणार आहे. भविष्यात देशाच्या कानाकोपर्यात नव्हे तर निर्यातही केला जाणार आहे.आंबा खरेदी केल्यानंतर बागायतदाराला त्वरीत पैसे दिले जाणार आहेत. तसेच आठवड्यापासून बिटकी आंबाही खरेदी केली जाईल असे प्रतिनिधींकडून सांगण्यात आले.